
कोकण विकासाबाबत रामदास कदम पुन्हा सक्रिय, सिंचनप्रश्नी मंत्रालयात घेतली बैठक
खेड:कोकण विकासाचा ध्यास घेतलेले शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम पुन्हा एकदा सक्रिय झाले असून सिंचनासारख्या महत्वाच्या प्रश्नावर त्यांनी जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांच्या
दालनात अधिकाऱ्यांची बैठक घेतली, कोकणची भौगिलिक रचना पाहता महाराष्ट्रात सिंचनाबाबत असेल्या मापदंडामध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी रामदास कदम यांनी या बैठकीत केली. या बैठकीत कोकणातील सिंचनाचा मुद्ध माडताना ते म्हणाले. राज्यात सर्वाधिक पाऊस हा कोकणात पडतो मात्र कोकणात केवळ १५ टक्केच सिंचन झाले आहे. जलसंधारण, पाटबंधारे या कामामध्ये कोकणावर कायमच अन्याय होतो आहे. कोकणावरील हा अन्याय दूर करण्यासाठी मंत्री महोदयांनी यात जातीने लक्ष घालावे. कोकणातील परिपुर्ण प्रस्तावाना मंजूरी देऊन यासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर करावा. कोकणातील काही प्रकल्प है कोकणाच्या भौगिलिक रचनेमुळे मापदडात बसत नाहीत. त्यामुळे कोकणावर एक प्रकारचा अन्याय होत आहे. म्हणन आवश्यक तिथे मापदडात बदल करण्यात यावेत. कोकणात पाणी ही मोठी समस्या आहे. तो कायमस्वरुपी सोडविण्यासाठी
कोकणात सुरु असलेल्या पाटबंधायांची काम तातडीने सुरु करावी अशी मागणीही रामदास कदम यांनी केली. या बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याना कोकणच्या सिंचनाचा प्रश्न तातडीने मागी लावा यासाठी आवश्यक तो परिपुर्ण प्रस्ताव तयार करून माझ्यासमोर ठेव, यापुढे कोकणातील योजनाबाबत आमदाराची तक्रार येता कामा नये, कोकणचे दौरे करा, पूर्वीच्या योजनांची पाहणी करा, अर्पण योजना मार्गी लागतील अशी कार्यवाही करा अशा सूचना जलसंधारण मंत्री शकराव गडाख यांनी केल्या.
या बैठकीला उपस्थित असलेले दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी मतदार संघातील भडवळे, शिवतर, कुडावळे, पालगड, साकुर्डे, सातेरे तफे नातू, करंजाणी, कर्दे, नारगोळी, कादवड, बामणघर, आंबवली, वडगांव, या १३ पाटबंधारे योजना
व २० सिमेंट बंधान्यांबाबत जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांच्याशी चर्चा केली.
www.konkantoday.com