
अनेकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, वेळ आली की त्या बाहेर काढणार : ना. उदय सामंत
रत्नागिरी : कोण किती निष्ठावान आहे, हे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेऊन जनतेला सांगणार आहे. अनेकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. वेळ येईल तेव्हा त्या बाहेर काढण्याचा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांचेे नाव न घेता दिला आहे. शनिवारी ना. सामंत रत्नागिरी शहराच्या दौर्यावर आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आम्ही आ. आदित्य ठाकरेंसोबत असताना त्यांच्या सभांना पन्नास हजार शिवसैनिकांची गर्दी होत होती. शुक्रवारच्या रत्नागिरीतील सभेत चारशे खुर्च्या होत्या. ही तर कॉर्नर सभा झाली. हा आदित्य ठाकरेंच्या कर्तृत्वाचा अपमान आहे. मात्र, इतरांच्या टीकेला जाहीर मेळावा घेऊन आपण उत्तर देणार आहे, असे ना. सामंत म्हणाले.