
रत्नागिरीतील सुरु असलेल्या कौशल्य विकास केंद्र येथे बोगस विद्यार्थी बसवून परीक्षा घेतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार
महाराष्ट्र शासनाव्दारे रत्नागिरीत सुरू असलेल्या काैशल्य विकास केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कागदपत्रे घेऊन खोटे प्रवेश दाखविण्याचे काम सुरू आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या जागी बनावटी विद्यार्थ्यांचे कागदपत्रे बनवून परीक्षा देण्यासाठी त्या बोगस विद्यार्थ्यांच्या जागी बोगस विद्यार्थ्याना बसविण्यात येते त्यासाठी बोगस आधारकार्ड, कागदपत्रे बनविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा प्रकार उघडकीस आणला आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे रत्नागिरीतील थिबा पॅलेस नजिक सुरु असलेल्या कौशल्य विकास केंद्र येथे बोगस विद्यार्थी बसवून परीक्षा घेतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि रत्नागिरील जागरूक नागरिकांमुळे उघड झालं आहे.शासनाकडून रत्नागिरीत चालवल्या जाणाऱ्या या कौशल्य विकास केंद्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून विविध प्रकारचे घोटाळे होताना दिसून येत आहे. ज्यात विविध महाविद्यालयांच्या अंतर्गत शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचे कागदपत्रे घेऊन खोटे प्रवेश दाखवण्याचे काम सुरु आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या जागी बनावट विद्यार्थ्याचे कागदपत्रे बनवून परीक्षा देण्यासाठी त्या बनावट विद्यार्थ्यांना बसवण्यात येत आहे. याप्रकरणी अभाविप चे पदाधिकारी आणि जागरूक नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकुरदेसाई यांनी आज हा प्रकार उघडकीस आणला.
काैशल्य विकास केंद्राला शासनाकडून पैसा येतो. शासनाकडून येणारा भरमसाठ निधी उकळण्याचा प्रकार असून कोट्यावधी रूपयांचा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com