उबाठा सेनेत मोठे फेरबदल उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी संजय कदम


लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होवून अवघे काही दिवस उलटले असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत उलथापालथ सुरू झाली आहे. उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि गुहागर विधानसभा क्षेत्राचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना पदावरून हटविण्यात आले असून जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार संजय कदम तर तालुकाप्रमुखपदी पंचायत समितीचे माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्याात आली आहे. तसेच पूर्व विदर्भासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी भास्कर जाधव यांना विभागीय नेते करण्यात आले आहे. ही निवड उबाठा सेनेचे मुखपत्र सामनातून जाहीर झाली आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button