
जोपर्यंत लागवड सुरू करून त्याचा नियोजनबद्ध आराखडा दिला जात नाही तोपर्यंत सोमवारी आत्मक्लेष आंदोलन
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात तोडल्या गेलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावण्याच्या दृष्टीने १० जूनपासून कार्यवाही करण्याचे गुरूवारी झालेल्या महामार्ग अधिकारी कंत्राटदार आणि वृक्ष लागवड हक्क समिती पदाधिकारी बैठकीत ठरले. मात्र जोपर्यंत लागवड सुरू करून त्याचा नियोजनबद्ध आराखडा दिला जात नाही तोपर्यंत सोमवारी आत्मक्लेष आंदोलन करण्याचा पवित्रा समितीने कायम ठेवला आहे.
वृक्ष लागवडीसंदर्भात गुरूवारी वृक्ष लागवड हक्क समितीने पत्रकार परिषद घेवून आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली. चौपदरीकरणात कुणीही लागवडीच्यादृष्टीने लक्ष देत नसल्याने आता आम्ही वृक्ष लागवड हक्क समिती स्थापन केलेली असल्याचे सांगितले. महामार्गाच्या वृक्ष लावण्यास होणार्या दिरंगाईला अधिकार्यांना जबाबदार धरले असुन वृक्ष लावले गेले नाहीत तर अधिकार्यांनाा फिरकूही देणार नाही, असा इशारा देत सोमवारपासून आत्मक्लेष आंदोलनाचा इशारा दिला होता. www.konkantoday.com