गेल्या दोन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी पावसाची हजेरी

गेल्या २ वर्षांचा विचार करता यावर्षीच मे महिन्यात पाऊस पडला आहे. काही गावांमध्ये ढगफुटी, वादळी पावसामुळे लाखोंचे नुकसान झाले. २०२२-२०२३ साली पावसाचा एक थेंबही पडला नव्हता. मात्र मागील ६ वर्षांचा विचार करता २०२१ साली तब्बल १८१ मि. मि. पाऊस पडला होता.
यावर्षी जानेवारी महिन्यापासूनच उष्णता जाणवत आहे. मार्च, एप्रिवल व मे महिन्यात सर्वाधिक उष्णता जाणवली. याचा परिणाम म्हणून मे महिन्यात अवकाळी पावसाची जणू अवकळाच झाली आहे. मे महिन्यात अनेकदा काही गावांमध्ये जोरदार पाऊस पडला. अनारी भागात तर ढगफुटी झाल्याने काही प्रमाणात नुकसान झाले. सावर्डे, डेरवण परिसरात तर वादळी पाऊस झाल्याने अनेक घरे, दुकाने व वाहनांचे मोठे नुकसान झाले. महावितरणलाही याचा फटका बसला.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button