कोकण मतदारसंघातून मनसेची माघार! “अभिजीत पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत”


विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांची निवडणूक सध्या सुरु आहे. या निवडणुकीत कोकण मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. या संदर्भातील पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशांनुसार प्रसिद्ध कऱण्यात आलं होतं. तर कोकण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, या निवडणुकीत मनसे आणि भाजपा आमने-सामने येण्याची शक्यता होती. त्याआधीच आता मनसेने कोकण पदवीधर निवडणुकीतून माघार घेतली आहे.
मनसेचे नेते अभिजीत पानसे हे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, अशी माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत विधानपरिषदेच्या पदवीधर कोकण मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती होती. त्यानंतर मनेसेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसे आणि भाजपा आता आमने-सामने येणार नाहीत, हे स्पष्ट झालं आहे.
“देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी राज ठाकरे यांना विनंती केली होती. त्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन अभिजीत पानसे हे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, असा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. फक्त निरंजन डावखरे हे उमेदवार असतील, असं ठरलं आहे. देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्याकडे येऊन गेल्यानंतर पुन्हा एकदा ते दोनदा या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे”, अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button