चार वर्षे उलटूनही अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीबाबत साठरेबांबरमधील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई नाही

रत्नागिरी तालुक्यातील पाली, पाथरट, साठरेबांबरमधील शेतकर्‍यांनी आपल्या शेतामध्ये चार वर्षापूर्वी रब्बी हंगामामध्ये कलिंगड पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. त्यावर काही दिवसातच अवकाळी पावसाचा परिणाम होवून कलिंगडाच्या वेलांवर बुरशीजन्य, वेलमर रोगाची लागण झाली होती. त्यामुळे फळधारणेवर ६० ते ७० टक्के परिणाम होवून उत्पादन घटले होते. याचा शेतकर्‍यांना फटका बसला होता. मात्र अद्यापही त्यांना कोणतीही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button