
रवी राणा यांनी त्यांची निवडणूक लढवावी. उगाच आमच्या नांदाला लागू नये-संजय राऊत
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी एक खळबळजनक दावा केला. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर उद्धव ठाकरे १५ दिवसांतच त्यांच्यासोबत जातील, असं राणा यांनी म्हटलं.दरम्यान, रवी राणा यांच्या या दाव्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलंय.शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी रवी राणा यांनी केलेल्या दाव्यावर राऊत म्हणाले, “शिवसेना पक्ष हा देशातील राजकारणातला सर्वात जुना पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष स्थापन केलेला आहे. गेल्या २५ वर्षांपासून उद्धव ठाकरे या पक्षाचं नेतृत्व करत आहेत”.”मागच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे १८ खासदार निवडून आलेले आहेत. या निवडणुकीतही ते निवडून येतील. अशा पक्षाच्या भूमिकांवरती कुणी काहीही बोलावं, हे बरोबर नाही. रवी राणा यांचा राजकारणाशी काहीही संबंध आला नाही. त्यांनी फक्त त्यांचं बघावं”, असं संजय राऊत म्हणाले.पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “रवी राणा यांनी त्यांची निवडणूक लढवावी. उगाच आमच्या नांदाला लागू नये. आमच्या भूमिका काय आहे, हे आम्ही एकत्रित बसून ठरवतो आणि त्यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेतात”.www.konkantoday.com