मध्य रेल्वेवर घेण्यातआलेला ६३ तासांचा जम्बोब्लॉक आज म्हणजेच रविवारी दुपारपर्यंतच संपणार

लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. मध्य रेल्वेवर घेण्यातआलेला ६३ तासांचा जम्बोब्लॉक आज म्हणजेच रविवारी दुपारपर्यंतच संपणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.मात्र, जम्बोब्लॉक संपल्यानंतरही लोकल ट्रेन भायखळा आणि वडाळा स्टेशनपर्यंतच धावणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.मध्य रेल्वेवरील सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) आणि ठाणे स्थानकांतील अत्यावश्यक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. यासाठी ठाण्यात ६३ तास आणि सीएसएमटी येथे ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकदरम्यान अनेक लोकल ट्रेन रद्द केल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर कामे आटोपून लोकलसेवा सुरळीत करावी, अशी विनंती प्रवासी करत आहेत. प्रवाशांची तारांबळ बघता प्रशासनाने देखील ब्लॉककाळात नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. सीएसएमटी आणि ठाणे स्टेशनवरील सुरू असलेली कामे जवळपास पूर्ण होत आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button