
मी महाराष्ट्रवादी’च्या माध्यमातून घराघरात जाणार -राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर
खा. शरद पवार गटातर्फे आता पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात आली असून, राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमीकरण अभियान राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.रत्नागिरीमध्येही या अभियानाला चार ते पाच दिवसात सुरुवात होणार असून ‘मी महाराष्ट्रवादी’च्या माध्यमातून घराघरात जाणार असल्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी सांगितले.
मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून राष्ट्रवादी सक्षमीकरणासाठी 25 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत घराघरात जाऊन खा. शरद पवार यांचे विचार पोहचवले जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील किमान 20 व त्याहून अधिक गावांमध्ये ही मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी, प्रमुख नेते, आजी-माजी आमदार स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी हे घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात झालेली विकास कामे, खा. शरद पवार यांनी महिला, युवक, शेतकरी यांच्याबाबत राबवलेले विकासात्मक धोरण यांची माहिती दिली जाणार आहे. यावेळी प्रत्येक घरात मी महाराष्ट्रवादी हे स्टीकर लावले जाणार आहेत. भाजपाने मागील नऊ वर्षाच्या सत्ताकाळात लादलेली महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचारात झालेली वाढ, हुकुमशाही प्रवृत्ती आणि राज्य-केंद्राचा कारभार चव्हाट्यावर आणला जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी सांगितले.
www.konkantoday.com