
साईडपट्ट्यांची कामे पूर्ण न झाल्याने देवरूखातील वाहनचालक त्रस्त, पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांकडे देवरूख नगर पंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिलेल्या सूचनांकडे देवरूख नगरपंचायतीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. साईडपट्ट्यांची कामे पूर्ण न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह वाहन चालक त्रस्त झाले आहेत.देवरूख नगर पंचायतीच्या हद्दीतील काही महत्वाच्या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. परंतु साईडपट्ट्यांची कामे न केल्याने दुचाकीस्वारांना अपघातग्रस्तांना सामोरे जावे लागत आहे. निसर्ग चक्रीवादळाची पार्श्वभूमी लक्षात घेवून सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे. नगर पंचायतीने मुख्य रस्त्यावर तत्काळ साईडपट्ट्यांची सोय करावी. सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. रस्त्याच्या कडेला पडलेल्या रस्त्याची तत्काळ विल्हेवाट लावावी, अशी सूचना ना. उदय सामंत यांनी केली होती.www.konkantoday.com