रिफायनरी प्रकल्प राजापुरातच होणार -किरण सामंत यांची ग्वाही

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यातच होणार असून सर्व रिफायनरी समर्थकांनी आश्‍वास्त रहावे, असा शब्द रत्नसिंधु समृद्ध योजनेचे संचालक व शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांनी रिफायनरी प्रकल्प समर्थकांना दिला.राजापूर तालुका रिफायनरी समन्वय समितीच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्प हा मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प होण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न चालू ठेवू असेही किरण सामंत यावेळी म्हणाले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button