निवळी ग्रा.पं. सदस्या सौ. श्‍वेता तोडकरी तब्बल २६ वर्षानी झाल्या बारावी उत्तीर्ण

रत्नागिरी तालुक्यातील बावनदी येथील अक्षया कमलाकर बेर्डे तथा सौ. श्‍वेता सुयोग तोडकरी या सन १९९७-९८ या वर्षात इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. तब्बल २६ वर्षानंतर त्यांनी बाहेरून फॉर्म भरून जाकादेवी केंद्रावर बारावीची परीक्षा दिली होती. ५८.६७ टक्के गुण मिळवून सौ. तोडकरी या बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.अक्षया कमलाकर बेर्डे यांचे माहेर आगरनरळ येथे असून पहिल्याच प्रयत्नात ५५ टक्के गुण मिळवून दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. बारावीचे शिक्षण घेण्यासाठी जवळपास कनिष्ठ महाविद्यालय नसल्याने त्यांनी शिक्षण थांबविण्याचा निर्णय घेतला होता. अक्षया बेर्डे यांचा सन २००५ मध्ये बावनदी येथील सुयोग तोडकरी यांच्याशी विवाह झाला. सौ. श्‍वेता तोडकरी या सध्या निवळी ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत. पती सुयोग तोडकरी, बहिण मेघना बेर्डे यांच्या पाठिंब्यावर सध्या निवळी ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत. पती सुयोग तोडकरी, बहिण मेघना बेर्डे यांच्या पाठिंब्यावर सौ. श्‍वेता तोडकरी यांनी इयत्ता बारावी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. जाकादेवी येथील बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात बारावीची परीक्षा देवून सौ. तोडकरी ५८.६७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. पती सुयोग तोडकरी यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयातील मार्गदर्शक शिक्षक, कुटुंबिय, मित्रमंडळ यांचे बहुमोल मार्गदर्शन, उचित प्रेरणा मिळाल्याचे सौ. श्‍वेता तोडकरी यांनी सांगितले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button