कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची रेल्वे प्रवासी संघाची मागणी.

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्यावतीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करावे व सावंतवाडी टर्मिनसला प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे असा ठराव हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे.यामध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या निर्मितीच्या वेळी २२ टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्याने केलेली आहे.

कोकण रेल्वे ही स्वायत्त संस्था असल्यामुळे निधीअभावी प्लॅटफॉर्मला शेड नाही. प्रवाशांना पावसात व उन्हात बसावे लागतेय, पूल, सरकते जीने, पिण्याचे पाणी, स्पीकर, अस्वच्छ बाथरूम व रेल्वेचे दुहेरीकरण अशी अनेक महत्वाची कामे मागील २५ वर्षे रखडलेली असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button