
कायद्याच्या अभ्यासासाठी पाच वर्षांची गरज -मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी याचीका फेटाळली
बारावीनंतर एलएलबीच्या अभ्यासाचा कालावधी पाच वर्षावरून तीन वर्षावर आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी याचिका ऐकण्यास नकार दिला. त्यानंतर याचिकाकर्त्याने आपले अपील मागे घेतले आणि याचिका फेटाळण्यात आली.www.konkantoday.com