
गेल्या वर्षभरात रत्नागिरी विभागात १ कोटी ५८ लाख ८९ हजार २५३ महिलांनी एसटीतून प्रवास केला
_राज्य परिवहन महामंडळाने महिलांसाठी सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेमुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.गेल्या वर्षभरात रत्नागिरी विभागात १ कोटी ५८ लाख ८९ हजार २५३ महिलांनी एसटीतून प्रवास केला आहे. त्यामुळे रत्नागिरी विभागाच्या तिजोरीत ३१ कोटी १ लाख ३३ हजार रुपये जमा झाले. आता सुट्टीच्या कालावधीत महिलांचा प्रवास वाढण्याची शक्यता आहे.www.konkantoday.com