रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात ५५० कि.मी.च्या भूमिगत विद्युतवाहिन्याकेंद्र शासनाच्या राष्ट्रीय सक्रीवादळ धोके निवारण योजनेतून

रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात सुमारे ५७२ कोटीच्या या प्रकल्पातून २ कि.मी. अंतरापर्यंतच्या वाहिन्या भूमिगत केल्या जाणार आहेत. यामध्ये लघुदाब २२०० कि.मी. तर उच्चदाब ५५० कि.मी. विद्युतवाहिन्यांचा समावेश आहे. त्या प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ झालेला असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता पळसुलेदेसाई यांनी दिली.महावितरण कंपनीला या मंजूर योजनेतून मंडणगड, दापोली, गुहागर, राजापूर, रत्नागिरी किनारपट्टीवर भूमिगत विद्युतवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. चक्रीवादळ, अतिवृष्टीमध्येही किनारी भागातील विद्युत ग्राहकांना विनाखंडित सेवा मिळावी यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त उपक्रमातून हे काम सुरू झाले आहे. महावितरण कंपनीने याचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी झालेल्या तौक्ते, निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली होती. त्यावेळी काट्यवधींचे नुकसान झाले होते. त्यामुळे भविष्यात कोकण किनारपट्टीवर अशा प्रकारचे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. त्यावर उपाययोजना म्हणून भूमिगत विद्युतवाहिन्यांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button