जैतापूर-हातिवले सागरी महामार्गावरील हातिवले येथे झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू
राजापूर तालुक्यातील जैतापूर-हातिवले सागरी महामार्गावरील हातिवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालया लगत असलेल्या उतारावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातामध्ये जुवाठी येथील विजय विठोबा बाणे (५०) हे जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सांयकाळी घडली.जुवाठी येथील विजय बाणे हे गुरूवारी दुपारी जुवाठी येथून दुचाकीने राजापूर येथे येत असताना हातिवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालया लगत असलेल्या उतारावर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीमध्ये गेली. यामध्ये विजय बाणे यांच्या डोक्याला तसेच चेहऱ्याला गंभीर दुखापत लागल्याने ते जागीच ठार झाले.www.konkantoday.com