रत्नागिरी जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्रांना आता घरघर ,26केंद्रांपैकी आता फक्त 12 केंद्र सुरू.

गरीब लोकांच्या उपासमार टाळण्यासाठी शासनाने अवघ्या 10 रुपयातशिवभोजन थाळी सुरू केली. परंतु शिवभोजन थाळी केंद्रांना आता घरघर लागली आहे. जिल्ह्यातील 26केंद्रांपैकी आता फक्त 12 केंद्र सुरू आहेत. 14 केंद्र बंद झाली आहेत. लाडक्या बहिण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी शिवभोजन थाळी बंद करण्याच्या शासनाच्या हालचाली आहे.

या योजनेअंतर्गत एप्रिल ते डिसेंबर 2024 पर्यंत 2 कोटी 48 लाख 89 हजार अनुदान प्राप्त झाले असून 89 लाख 93 हजार 750 एवढे अनुदान शिल्लक आहे.शासनाकडून दहा रुपयांत शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. यात दहा रुपयांत पोटभर जेवण मिळते. कोरोनाकाळात तत्कालीन शासनाने ही थाळी मोफत दिली जात होती. आता पुन्हा ही थाळी दहा रुपयांत देण्यात येते. यासाठी केंद्रचालकांना ४० रुपये अनुदान देण्यात येते. मात्र, हे अनुदान महागाईमुळे आता अपुरे पडत आहे. जिल्ह्यातील 26 शिबभोजन केंद्र मंजूर आहेत. त्यांना 3050 थाळ्या मंजूर आहेत. परंतु या केंद्रांपैकी 12 केंद्रच सुरू आहेत. १२ शिवभोजन केंद्रांवर १० रुपयात जेवण दिले जाते.

मजुरांची उपासमार टळावी, यासाठी शासनाकडून दहा रुपयांत शिवभोजन थाळी सुरु केली. यामध्ये भात, चपाती, आमटी, भाजीचा समावेश आहे.

या केंद्र चालकांना प्रत्येक थाळीमागे लाभार्थीचे १० रुपये आणि शासनाकडून ४० रुपयांचे अनुदान मिळते. परंतु शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली आहे. त्याचा मोठा आर्थिक भार राज्याच्या तिजोरीवर पडत आहे. तो कमी करण्यासाठी कोरोनापासून सुरू असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्यादृष्टीने शासनाच्या हालचाली सुरू आहेत. ही योजना बंद झाल्यास शासनाचा खर्च कमी होणार आहे. 12 केंद्रांना एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत 2 कोटी 48 लाख 89 हजार एवढे शासनाकडुन अनुदान प्राप्त झाले आहे. 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत 89 लाख 93 हजार 750 एवढे अनुदान शिल्लक आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button