रत्नागिरी तटरक्षक दलाला युद्ध नायक पटवर्धन यांचे नाव देण्याची मागणी

रत्नागिरीतील तटरक्षक दलाला पहिल्या विश्‍व युद्धातील युद्ध नायक आणि भारतातले पहिले पायलट दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन यांचे नाव देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन अभिजित पटवर्धन यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.रत्नागिरी शहरातील युवा अभिजित पटवर्धन याने दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरीतील एक ऐतिहासिक व्यक्तीमत्व म्हणून सर दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन यांची काही थोडक्यात लोकांना ओळख आहे. दत्तात्रय पटवर्धन हे पहिल्या विश्‍वयुद्धात बर्निल बॉम्बस्फोट ही मोहीम हाती घेणारे पहिले भारतीय वैमानिक होते. त्यांच्या धाडसीपणाचे विल्यम जॉर्ज (५ वा) यांच्याकडून कौतुक करण्यात आले होते. त्यांना उच्च लष्करी सन्मानाने गौरविण्यात आले होते.रत्नागिरी येथे होवु घातलेल्या विमानतळाला आणि रत्नागिरीतील तटरक्षक दलाला सर दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन यांचे नाव देवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात यावी असे निवेदनात पटवर्धन यांनी म्हटले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button