रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये येथे असलेल्या हॉटेल कोहिनूर हॉटेल मॅनेजमेंटच्या जुन्या इमारतीमध्ये अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड, सुमारे ४ लाख रूपयांचे नुकसान

रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये येथे असलेल्या हॉटेल कोहिनूर हॉटेल मॅनेजमेंटच्या जुन्या इमारतीमध्ये अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. यामध्यें सुमारे ४ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही तोडफोड नेमकी कुणी व कोणत्या कारणातून केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञांतांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी पावस मार्गावर हॉटेल कोहिनूर असून याठिकाणी कोहिनूर हॉटेल मॅनेजमेंटची देखील इमारत उभारण्यात आली होती. सध्या ही इमारत जुनी झाली असून वापराविना पडून होती. ५ ते ११ मे २०२४ या दरम्यानच्या काळात याठिकाणी अज्ञातांनी घुसून सर्व साहित्याची तोडफोड केली. यामध्ये इमारतीमधील बेसीन, दरवाजे, इमारतीच्या काचा, इलेक्ट्रिक फिटींगचे सामान, बाथरूमधील नळ, शॉवर हेड, बेसीन सी पाईप आदींची चार लाख रूपयांचे नुकसान तोडफोड व त्यातील काही माल चोरून नेत सुमारे ४ लाख रूपयांचे नुकसान केले असल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले.कोहिनूर हॉटेलचे व्यवस्थापक विजयेंद्र ओमप्रकाश सिंग (४३, रा. पावस रत्नागिरी) यांनी याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button