
गणपतीपुळे-चाफे रस्त्यावर दोन कारमध्ये टक्कर, चालकाविरूद्ध गुन्हा
गणपतीपुळे-चाफे रस्त्यावर दोन कारमध्ये झालेल्या अपघातप्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा ठपका ठेवत कारचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. साहिल उल्हास मुळे (२८, रा. जाकादेवी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल मुळे हा १७ मे रोजी आपल्या ताब्यातील कार (एमएच ०८ एन ६५२५) घेवून गणपतीपुळे ते चाफे असा जात होता. यावेळी समोरून येणार्या ऑरा कारला त्याची जोराची धडक बसली. यामध्ये केतन रमेश भंडारी (२५), भावना केतन भंडारी (२४), सलोनी कमलाकर म्हात्रे (२५, रा. अंबरनाथ ठाणे) हे जखमी झाले होते. www.konkantoday.com