
रत्नागिरी दक्षिण भा.ज.पा.ची संघटनात्मक रचना ७५ % पूर्ण – ॲड. दीपक पटवर्धन
भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. संघटनात्मक रचनेला पक्षामध्ये महत्त्व दिले जाते. रत्नागिरी दक्षिण भा.ज.पा.मध्ये रत्नागिरी शहर, रत्नागिरी तालुका, लांजा, राजापूर, संगमेश्वर ही ५ मंडले आहेत. ५ मंडलाचे ५ अध्यक्ष व तालुका कार्यकारिणी विधिवत गठीत झाल्या असून ५ ही मंडलांमध्ये बूथ रचना, शक्तीकेंद्र प्रमुख नियुक्त्यांचे काम ७५% पूर्ण झाले असून प्रदेशाकडे त्याबाबत माहिती नोंद झाली आहे.
भा.ज.पा. जिल्हा पदाधिकारी संख्या २४ असून ९० सदस्यांची कार्यकारिणी पूर्ण झाली आहे. मोर्चा व आघाड्या यांचे अध्यक्ष व संयोजक यांच्या नियुक्त्या झाल्या असून ५ मंडले मिळून ८३५ बूथ असून सर्वसाधारण ५ बूथ मिळून १ शक्तीकेंद्र रचना असून १५८ शक्तीकेंद्रे तयार करण्यात आली. ८३५ बूथ पैकी ६३१ बूथ प्रमुख नियुक्त झाले असून १५८ शक्तीकेंद्रांपैकी १४१ शक्तीकेंद्र प्रमुख नियुक्त झाले आहेत. उर्वरित ठिकाणी संघटनात्मक रचना तयार करण्याचे काम सुरू आहे. संघटनात्मक रचना लावण्यामध्ये उत्तम यश प्राप्त होत असून कार्यकर्त्यांचा ओढा संघटनात्मक कामासाठी वाढलेला दिसत आहे. प्रदेश चिटणीस आ.निलेशची राणे, मा.श्री.प्रमोदजी जठार, आ.प्रसादजी लाड, प्रदेश सरचिटणीस आ.रवींद्रजी चव्हाण यांनी जिल्ह्यात विशेष लक्ष दिले असून आता ना. नारायणराव राणे केंद्रीय मंत्री पदी विराजमान झाल्याने संपूर्ण संघटनेला नव संजीवनी प्राप्त झाली आहे. बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख यांना नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम सुरू असून बूथ अध्यक्ष शक्तीकेंद्र प्रमुख मग तालुकाध्यक्ष त्याचे नंतर जिल्हाध्यक्ष व प्रदेश अशी संघटनात्मक रचना परिपूर्ण करण्यासाठी विशेष अभियान राबवत आहोत अशी माहिती ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.