आता दुपार झाली, ते उठले असतील आणि सुपारी चघळत असतील. असे सुपारीबाज, खोकेबाज आपल्याला नको- उद्धव ठाकरे यांची राज ठाकरेंवर टीका

उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी आज दादरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.भाजपाने इतर पक्षातले चारित्रहीन, गद्दार, भ्रष्टाचारी लोक जमवले, तेही त्यांना पुरे पडत नव्हते, म्हणून कुणीतरी नावाला ठाकरे पाहीजे होता. म्हणून तोही आता भाड्याने घेतला”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर सभेला जमलेल्या लोकांमधून “उठ दुपारी, घे सुपारी”, अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता म्हटले, “आता दुपार झाली, ते उठले असतील आणि सुपारी चघळत असतील. असे सुपारीबाज, खोकेबाज आपल्याला नको”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.“घाटकोपरमध्ये भाजपाच्या बगलबच्च्याने महाकाय होर्डिंग उभारले होते. होर्डिंग कोसळून अनेक लोक मृत्यूमुखी पडले, कित्येकजण जखमी झाले. या दुर्घटनेच्या दोन दिवसांनंतर मोदींनी घाटकोपरमध्येच वाजत गाजत रोड शो केला. लेझीम, ढोल-ताशा, फुलं उधळत रोड शो केला. या रोड शो साठी मुंबई महानगरपालिकेकडून पाच ते दहा कोटींचा खर्च करण्यात आला, अशी माहिती माझ्याकडे प्राप्त झाली आहे”, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. “पंतप्रधान असले म्हणून जनतेच्या पैशांतून तुमचा प्रचार कसा काय करता? निवडणूक आयोग यावरही डोळेझाक करेल. ४ जून नंतर निवडणूक आयुक्तांना ठेवायचे की नाही? हे ठरवू”, असा इशाराही त्यांनी दिला.“मुंबईकरांच्या आयुष्यातली दहा वर्ष वाया गेल्यानंतर आपण यांना मतं का द्यायची? असा प्रश्न निर्माण होतो. या निवडणुकीत भाजपाकडे उमेदवारही नाहीत. त्यामुळे आमची मुले कडेवर घेऊन फिरत आहेत. भाजपाला राजकारणात मुलंच होत नाहीत. म्हणून त्यांना दुसऱ्यांची मुलं पळवावी लागतात, असे मी नेहमी म्हणतो. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button