फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या वाहनचालकांवर ट्रॅफिक पोलिसांनी केली कारवाई , मोहीम चालूच ठेवणार


आज रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकवाहने व दुचाकी घेऊन रस्त्यावर आले आहेत अशा विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांविरुद्ध ट्रॅफिक पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे ट्रॅफिक विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मारुती मंदिर परिसरात या वाहनचालकांवर कारवाई सुरू केली असून आतापर्यंत सहाशे वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे शासनाने घातलेला मनाई आदेश हा तुमच्या काळजीपोटी घातलेला आहे असे असतानाही लोक बाहेर पडत आहेत हे चुकीचे आहे अत्यावश्यक गरज असेल तरच बाहेर पडा अन्यथा अशा लोकांवर कारवाई केली जाईल ही कारवाईची मोहीम चालू राहील असा इशारा ट्रॅफिक विभागाचे निरीक्षक अनिल विभुते यानी दिला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button