स्वतःचा टँकर असताना देखील राजापूर तालुक्यात खाजगी टँकर धावू लागला

जिल्ह्यातील अन्य तालुक्यात तीव्र पाणीटंचाईमुळे टँकर धावू लागलेले असताना राजापूर तालुका, मात्र यंदाही कागदावरच टँकरमुक्त राहिलेला होता. त्यातच तालुक्याच्या ग्रामीण भागातून टँकरद्वारे पाणीपुरवठयाची मागणी होवूनही प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येत नव्हता. मात्र यंदा तालुक्यामध्ये अखेर एक खाजगी टँकर धावू लागला आहे. आठ गावांमधील ९ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.यावर्षी मात्र टँकर धावल्याने राजापूर तालुका टँकरमुक्त तालुका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच राजापूर पं. समितीकडील तालुक्यासाठी असलेला टँकर लांजा तालुक्याला देवून राजापूर पंचायत समितीने दाखवलेल्या औदार्याची चर्चाही झडू लागली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button