
रत्नागिरी जिल्हात एकही अनधिकृत जोडणी नाही
उर्जा विभागाच्या कृषीपंप जोडणी धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कृषी पंपाद्वारे अनधिकृत वीजवापर सुरू आहेत. त्यांना नवीन वीजजोडण्या देण्यात येणार आहेत. मात्र जिल्ह्यात एकही अनधिकृत वीजजोडणी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कृषीपंप वीजजोडणी धोरणानुसार लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या कृषीपंपांना परिसरातील नजिकच्या रोहित्राची क्षमता पर्याप्त असल्यास नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
www.konkantoday.com