तर तुमच्या महायुतीचा मतं मागणारा हात कापल्याशिवाय राहणार नाही-उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या हक्काचा घास गुजरातला देणार असाल तर तुमच्या महायुतीचा मतं मागणारा हात कापल्याशिवाय राहणार नाही”, असा इशाराच यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुतीला व भाजपला दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रफुल पटेल यांचा देखील खरपूस समाचार घेतला. प्रफुल पटेल यांनी छत्रपतींचा जिरेटोप मोदींना घातल्याच्या घटनेचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली. ”महाराजांचा जिरेटोप ज्या डोक्यावर ठेवताय ते डोकं कसं आहे ते बघा”, असे उद्धव ठाकरे यांनी प्रफुल पटेलांना सुनावले.आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. छत्रपती संभाजी महाराजांकडून स्वराज्य कसं सांभाळाचं ते महाराष्ट्राने पाहिलं. त्यांच्यासमोर जीवन मरणाचा प्रश्न होता. तरीसुद्धा अत्याचाराला न घाबरता, न डगमगता. प्राण गेला तरी बेहत्तर मी औरंगझेबासमोर झुकणार नाही असं ते वागले. नाहीतर आताचे जे नेभळट लोकं फिरतायत त्य़ांना छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.”गेली दहा वर्ष हे सत्तेत आहेत. दहा वर्षात कुणी कुणाच्या पाठीत वार केला ते आपण बघत आलो आहोत. आम्हाला आशा होती की मोदी काहीतरी करुण दाखवतील म्हणून आम्ही त्यांच्या सोबत होतो. पण आता त्यांच्या इंजिनामागे एक एक डबे लागत गेले. डबे जोडत चालले आहेत, पण यांचं इंजिन पुढेच जात नाही. पूर्वी वाफेचे इंजिन होतं तसं यांचं थापांचं इंजिन आहे. आता देशातल्या जनतेने ठरवलंय की दिल्लीतलं मुख्य इंजिनच बदलून टाकायचं आहे. आता ते इंजिन गुजरातला पाठवून द्यायचं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button