महाविकास आघाडीच्या राज्यात 36 प्लस जागा येतील-आमदार भास्कर जाधव
लोकसभा निवडणूक ही विचार विरुद्ध अहंकाराची लढाई आहे. महाराष्ट्रात मी प्रचारासाठी फिरलो तेव्हा सर्वत्र नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तीव्र संताप लोकांमध्ये दिसला.महायुतीला अहंकार आहे,त्यांच्या राज्यात 45 प्लस जागा येतील अशी त्यांची मस्ती होती. इस बार 400 पार अशी घोषणा देणाऱ्या भाजपाला इस बार भाजप तडीपार असा नारा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आणि तो आवाज देशात घुमला.महाराष्ट्रात 36 सभा मोदी आणि शाह घेतील,पण महाविकास आघाडीच्या राज्यात 36 प्लस जागा येतील असे ठाम प्रतिपादन शिवसेना नेते,आमदार भास्कर जाधव यांनी काल रात्री मालाड पूर्व,कुरार येथे केले.एक एकेला सबसे भारी,पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही तर त्यांचे नाव उद्धव ठाकरे असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी अमोल कीर्तिकर साठी ही निवडणूक सोपी केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.www.konkantoday.com