
उद्योजक आमच्यामुळे नाहीतर, माजी मुख्यमंत्र्यामुळे पळाले- उद्योग मंत्री उदय सामंत यांचा आरोप
महाराष्ट्रात आलेले उद्योग गुजरात पळवले, अशी टीका विरोधी पक्षाकडून सत्ताधारी महायुतीवर सातत्याने केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हा मुद्दा वारंवार उपस्थित केले आहे.या मुद्यावर काहीसे बॅकफूटवर महायुती पाहण्यास मिळते. मात्र, याच मुद्द्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फ्रंटफूटवर येत जोरदार टोलेबाजी केली. उद्योग गुजरात जाण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच उदय सामंत यांनी जबाबदार धरले आहे.महाराष्ट्रातील पोलिसांना हाताशी धरून उद्योजक अंबानींच्या घराखाली जिलेटिने ठेवणार असू तर, महाराष्ट्रात उद्योग आणि उद्योजक कसे येतील. उद्योजक आमच्यामुळे नाहीतर, माजी मुख्यमंत्र्यामुळे पळाले’, असा घाणाघाती आरोप मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला.गेल्या पावणेदोन वर्षात कोणालाही अँटीचेंबरमध्ये न बोलविता साडेदहा हजार कोटी रुपये थेट उद्योजकांच्या खात्यात पाठविले. अशोक चव्हाणांनंतर एकही उद्योगमंत्री श्रीरामपूरला भेट द्यायला आला नाही, हे दुर्दैव आहे. दावोसमध्ये तीन लाख 78 हजार कोटी रुपयांचे करार पहिल्यांदाच महाराष्ट्राने केले. त्यातील 65 टक्के अंमलबजावणीही झाली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात फक्त पाच हजार उद्योजकांची निर्मिती झाली होती, असा दावा मंत्री सामंत यांनी केला.www.konkantoday.com