
नागरिकांनो पाणी कमी वापरा, सोमवारपासून रत्नागिरी शहराला एक दिवसआड पाणी पुरवठा
मे महिन्यात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना यावेळी रत्नागिरीत पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे 24 तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा करणाऱ्या रत्नागिरी नगर परिषदेला आता शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे त्यामुळे रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांना व नागरिकांना पाण्याची काटकसर करत पाणी वापरावे लागणार आहे वाढता उष्मा आणि त्यामुळे जलदगतीने घटत जाणारा पाणीसाठा यावर उपाय म्हणून रत्नागिरी शहराला करण्यात येणारा पाणी पुरवठा सोमवार पासून एक दिवस आड करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत शीळ धरणात जूनच्या पंधरवड्यापर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे रनप प्रशासनाने कळवले आहे.रत्नागिरी शहरात सद्यस्थितीत शिळ या एकमेव धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. या वर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने रत्नागिरी नगरपरिषदेस पाणीपुरवठा करणा-या शिळ धरणात कमी पाणीसाठा झाला आहे. तसेच, चालू उन्हाळ्यात आलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे होणा-या बाष्पीभवनामुळे पाण्याचा -हास विचारात घेता शिळ धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस वेगाने कमी होत आहे.सद्यस्थितीत शिळ धरणात 0.814 द.ल.घ.मी. इतका उपयुक्त म्हणजेच 20 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यदा कदाचित मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्यास व धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आल्यास दुसरा कोणताही जलस्त्रोत तथा पर्याय उपलब्ध नसल्याने शहरात भिषण पाणीटंचाई उद्भवू शकते. परिणामी, धरणातील पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. जेणेकरुन अल-निनोच्या प्रवाहामुळे संभाव्य पाणीटंचाईची झळ नागरीकांस पोहचू नये यासाठी रनपने आतापासून पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. एकीकडे नगर परिषदेकडून नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले जात असतानाच शहरात घालण्यात नव्या नळ पाणी योजनेचे पाईप सतत फुटत असल्याने हे पाणी मात्र वाया जात आहे त्यामुळे नगर परिषदेने ही गळती आधी थांबवावी व पाण्याची काटकसर करावी असे नागरिकांचे म्हणणे आहेwww.konkantoday.com