विजयाचा दावा करणारी उद्धवसेना म्हणजे दुकानात माल नाही आणि तरी सर्व छान-नारायण राणे

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरील विजयाचा दावा करणारी उद्धवसेना म्हणजे दुकानात माल नाही आणि तरी सर्व छान म्हणत आहे, अशी टीका महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी केली.स्वत:चे मतदान झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी भेटी देऊन नारायण राणे रत्नागिरीमध्ये दाखल झाले. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर नारायण राणे यांनी रत्नागिरीतील भाजपच्या पदाधिका-यांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धवसेनेवर टीका केली.उद्धवसेनेकडून दोन-तीन लाखांच्या मताधिक्याचा दावा केला जात आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, दुकानात माल नाही आणि तरी सर्व छान चालले आहे, असे म्हणण्यासाठी उद्धवसेनेची अवस्था आहे. माणसेच नाहीत तरी ते दावे मात्र मोठमाठे करत आहेत. आपल्या प्रचारात सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी यावेळी आभार मानले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button