
मराठा समाजासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे -नारायण राणे
महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले आहे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडीने आता तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत फडणवीस सरकारने दिल्या होत्या, तशा शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती देऊन मराठा समाजासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केली.
www.konkantoday.com