
अंतिम वर्षातील फेल विद्यार्थ्यांनाही देता येणार ‘एंन्ट्रस’; प्रवेशापूर्वी उत्तीर्णची अट; 13 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात
पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी लागू झालेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमासाठीही लागू होणार आहे. पदवीच्या अंतिम तथा तृतीय वर्षात शिकणाऱ्या, पण एक-दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना नवीन धोरणानुसार पुढील प्रवेशासाठी एंन्ट्रस देता येईल, फक्त प्रवेश अंतिम होण्यापूर्वी विद्यार्थ्याचा निकाल लागून त्यात तो उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या विषयातून शिकता येणार आहे. पदवीला प्रवेश घेतल्यानंतर एक-दोन वर्षानंतर संबंधित विद्यार्थ्याने मधूनच महाविद्यालय सोडल्यास त्या विद्यार्थ्यास एक-दोन वर्षाचे देखील स्वतंत्र प्रमाणपत्र मिळणार आहे. पदवी झालेल्या विद्यार्थ्याने पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेतल्यानंतर त्याला पुढे पीएचडीची संधी मिळणार आहे.www.konkantoday.com