रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीन नेट मासेमारी बंद करण्याची आवराआवर सुरू

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीन नेट मासेमारी बंद करण्याची आवराआवर सुरू झाली आहे. समुद्रातील जोरदार वार्‍यांमुळे मासेमारी नौका समुद्रात जाणे धोकादायक होते. या पार्श्‍वभूमीवर आणखी आर्थिक भुदंड पडू नये यासाठी नौका मालकांनी यापूर्वीच आपल्या नौका बंदरात उभ्या करून मासेमारी बंद केली आहे. दरवर्षी १० मे नंतर पर्ससीन नेट मासेमारी करणार्‍या नाौकाा समुद्रात जात नाहीत.रत्नागिरी जिल्ह्याला १६७ कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे. जिल्ह्यात २ हजार ५२० सागरी मासेमारी नौका असून त्यामध्ये २८० पर्ससीन नेट नौकासुद्धा आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून बहुसंख्य नौकांना खर्चाइतकीही मासळी मिळालेली नाही. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून समुद्रात जोरदार वारे वहात आहेत. या पार्श्‍वभूमीवर बहुसंख्य नौका मालकांनी १० मे पूर्वीच नौका बंदरात आणून उभ्या केल्या आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button