चिपळूण तालुक्यात टंचाईग्रस्तांना पाणी पुरविणार्‍या टँकरचीच टंचाई

चिपळूण तालुक्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचे सावट गडद होत चालले आहे. दुर्गम, ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढू लागली आहे. मात्र या गाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे केवळ दोनच टँकर उपलब्ध आहेत. या एका टँकरच्या माध्यमातून १५ गावातील ३२ वाड्यांना पाणी पुरवठा करताना प्रशासनाचीही दमछाक होवू लागली आहे. टंचाईग्रस्तांना पाणी पुरविणार्‍या टँकरचीच टंचाई भासू लागल्याने कोणी टँकर देते का टँकर अशी म्हणण्याची नामुष्की सध्या चिपळूण प्रशासनावर येवून ठेपली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button