राजापूर तालुक्यातील नाटे येथील बिल्वा हिने रचली फडणवीस, राणेंवर कविता

राजापूर तालुक्यातील नाटे येथील रहिवासी व नववीत शिकणार्‍या बिल्वा गणेश रानडे हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर रचलेल्या कविता या दोन्ही नेत्यांना भेट देत त्यांची कौतुकाची थाप मिळवली आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी राजापूर भेटीवर आले होते. यावेळी वरचीपेठ येथील राजीव गांधी मैदानावर प्रचारसभेचे आयोजन केले होते. या सभेच्या दरम्यान कु. बिल्वा हिने स्वरचित कवितांच्या फ्रेम करून भेट या दोन्ही नेत्यांना दिल्या. केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा आपल्या कवितेतून तिने घेतला आहे. आपल्या काव्यप्रतिभेतून कु. बिल्वा हिने समर्पक असे वर्णन दोन्ही नेत्यांचे केले आहे. तिने रचलेल्या कवितांबद्दल कु. बिल्वा हिचे कौतूक केले तर या दोन्ही नेत्यांच्या स्वाक्षर्‍या घेत त्या जपून ठेवण्याचा संकल्प कु. बिल्वा हिने केला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button