लघुउद्योजक आणि शासन एकत्र आल्यास रत्नागिरीचा नक्कीच विकास -नारायण राणे

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघुउद्योजक आणि शासन एकत्र आल्यास रत्नागिरीचा नक्कीच विकास होवू शकेल. तसेच कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. त्यासाठीही विशेष प्रयत्न करणार असून आंबा व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यावर जास्त भर दिला पाहिजे. या सोबतच मच्छिमारांसाठी ठोस कायदे करणे गरजेचे आहे. या सगळ्यांसाठी लघुउद्योजक व बुद्धिजीवी लोकांना बरोबर घेवून काम करणे अत्यंत गरजेचे आहे. असे मत रत्नागिरी-सिंधुुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी व्यक्त केले.रत्नागिरीतील प्रतिष्ठीत आणि बुद्धिजीवी नागरिकांसोबत राणे यांनी औपचारिक बैठक घेतली. बैठकीला रत्नागिरी संस्थात्मक आणि रचनात्मक काम करणार्‍या प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होत्या. गद्रे मरीन कंपनीचे संस्थापक दीपक गद्रे, ऍड. बाबा परूळेकर, स्वामी स्वरूपानंद संस्थेचे दीपक पटवर्धन, डॉ. संतोष बेडेकर, डॉ. सुधांशू आणि कल्पना मेहता, ऍड. कदम, ऍड. नेने, ऍड. महेंद्र मांडवकर, उद्योजक राजू जोशी, रेश्मा जोशी, बांधकाम व्यावसायिक वाघधरे, भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह श्रीराम भावे, मुग्धा भट-सामंत आदी मान्यवर उपस्थित होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button