
उत्साहात बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढणे व्यापाऱ्यांच्या अंगलट आले
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने या उत्साहात बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढणे व्यापाऱ्यांच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष, राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांच्यासह १३ व्यापाऱ्यांवर मंगळवारी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पाच दिवसांचा अपवाद वगळता सुमारे तीन महिने दुकाने बंद होतीआनंद साजरा करण्यासाठी राजारामपुरी येथे बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढली. या बैलगाडीत गांधी हे व्यापारी, नागरिकांना अभिवादन करत होते. अन्य व्यापारी ‘करोना नियमावलीचे पालन करावे’ असे प्रबोधन फलक घेऊन चालत जात होते.
सामाजिक कार्यकर्ते बाबा इंदुलकर व अशोक देसाई यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली हाेती
www.konkantoday.com