रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर रिफायनरी प्रकल्प आणणे काळाची गरज – माजी आमदार प्रमोद जठार

कोरोनामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ पाच लाख चाकरमानी दाखल झाले आहेत. यातील अनेकांच्या नोकर्‍या गेल्याने ते बेरोजगार झाले आहेत. या बेरोजगारांना खरोखरच रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर रिफायनरी प्रकल्प आणणे काळाची गरज आहे केंद्र शासनाने राज्य शासनाला या प्रकल्पाच्या उभारणीबाबत दोन महिन्याचा अल्टिमेट दिला आहे, असे भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत केले कोकणातील तरुणांच्या भवितव्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पासाठी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यानी केलेहा प्रकल्प भाजपमुळे झाला की शिवसेनेमुळे झाला हा मुद्दा गौण असून, येथील जनतेच्या भल्यासाठी हा प्रकल्प गरजेचा असल्याची भूमिकाही त्यांनी व्यक्‍त केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button