राजापूर शहरालगत पुनर्वसन वसाहतीमधील तहसील निवास स्थानासमोर कचर्‍याचा खच

राजापूर शहरालगत पुनर्वसन वसाहतीमधील तहसील निवास स्थानासमोर कचर्‍याचा खच पडला असून यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.तहसीलदार यांचे निवासस्थान विनावापर पडून असल्याने त्या ठिकाणी गेटच्याा बाहेर या परिसरातील नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा दिसून येत आहे. यामुळे शासनाच्या स्वच्छता मोहिमेची येथील नागरिकांनी खिल्ली उडवली असल्याचे दिसून येत असून याला जबाबदार कोण असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button