
सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे मानधन रखडले
*. राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च आणि एप्रिल असे दोन महिन्याचे मानधन रखडले आहे. लोकसभा निवडणूक आणि लग्नसराईची धामधूम असताना मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.रखडलेल्या मानधन त्वरित अदा करावे; अन्यथा ऐन निवडणुकीच्या काळात अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.राज्यात महिला व बाल विकास विभागामार्फत सुमारे एक लाख अंगणवाडी केंद्र असून, त्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत.www.konkantoday.com