रत्नागिरी शहरात उमेदवारांच्या मिरवणुका मात्र वाहतूककोंडीने उन्हात सामान्यांचे हाल


रत्नागिरी शहरात काल महायुतीच्या वतीने नारायण राणे यांनी अर्ज भरला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात येणाऱ्या रॅलीमुळे रत्नागिरी शहरातील मुख्य मार्गावरील एक बाजू बंद करण्यात आली होती तसेच वाहतूक काही ठिकाणी एकदिशा तर काही ठिकाणी पर्यायी रस्त्याने वळवण्यात आली होती; मात्र या नियोजनाचा बोजवारा उडाला. दुपारी बारा ते अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार पाहायला मिळाला रॅली साठी आलेल्या गाड्यांची गर्दी त्यातच रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाची कामे यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली या कालावधीत वाहतूक नियंत्रण करताना पोलिसांना कसरत करावी लागली. अडीचनंतर गर्दी ओसरली आणि वाहतूक सुरळीत झाली. त्यामुळे रणरणत्या उन्हात सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले.
अखरेचा दिवस असल्यामुळे महायुतीचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाठीराखे लहान-मोठी शेकडो वाहने घेऊन रत्नागिरी शहरात दाखल झाले होते. आधीच शहरातील विविध रस्त्यांवर काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. सीएनजी गॅससाठी ठिकठिकाणी खोदलेले रस्ते, अचानक शहरात वाहनांची गर्दी झाल्याने शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती. शहराबाहेरून आलेली असंख्य वाहने आणि त्यातून आलेले कार्यकर्ते, पदाधिकारी यामुळे रत्नागिरी शहरातील वाहतुकीवरील अचानक ताण वाढला.
दुपारी तीन ते साडेतीननंतर वाहतुक व्यवस्था सुरळीत झाली; मात्र वाहनधारकांसह सर्वसामान्यांचे या वाहतूककोंडीत प्रचंड हाल झाले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button