डागडुजीसाठी तीन धरणे केली रिकामी; टँकरने पाणीपुरवठा सुरू

रत्नागिरी : जिल्ह्याच्या टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये भर पडली आहे. सध्या 64 गावातील 117 वाड्यांना 10 टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. 18 हजार 766 लोकांना टँकरचा आधार आहे. संगमेश्वरमधील एक आणि मंडणगडमधील तीन धरणांतील पाणीसाठा दुरुस्तीसाठी सोडून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या सुमारे 39 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.
पावसाळ्यापूर्वीच्या दुरुस्तीसाठी काही धरणातील पाणीसाठा कमी करण्यात येत आहे. संगमेश्वर तालुक्यातील उमरे येथील पाणी सोडण्यात आले आहे. तर मंडणगड तालुक्यातील भोळवली, चिंचाळ, पणदेरी या क्षेत्रातील पाणी कमी झाल्यामुळे त्यावर आधारीत नळ योजनांचे पाणी बंद झाले आहे. ऐन उन्हाळ्यात तेथील ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
उमरेतील एका धरणावर 11 वाड्या तर मंडणगडमधील तीन धरणांवर 28 वाड्यांचा पाणी पुरवठा अवलंबून होता.  तेथील लोकांची गैरसोय टाळण्यासाठी टँकरने पाणी सुरू करण्यात आले आहे. तशी मागणी तेथील ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. गतवर्षी याच कालावधीत 64 गावातील 106 वाड्यांना टँकरने पाणी पुरवले जात होते. यंदा 117 वाड्यांना टँकरचा आधार आहे. आतापर्यंत 615 टँकरच्या फेर्‍या झाल्या असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button