बंद पडलेल्या शाळांचे दरवाजे पुन्हा उघडणार, विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर मतदानासाठी

पटसंख्येअभावी बंद पडलेल्या शाळांचे दरवाजे पुन्हा एकदा उघडणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बंद पडलेल्या जिल्हा परिषदेच्या ४३ शाळा दि. ७ मेला मतदानाच्या दिवशी पुन्हा उघडणार आहेत. त्यापैकी अनेक शाळांची पडझड झाली आहे. त्या शाळांची दुरूस्ती करण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषद बांधकाम विभागासमोर आहे.गेल्या काही वर्षात पटसंख्येअभावी जिल्ह्यातील अनेक शाळा बंद पडल्या. २०१९ नंतर गेल्या पाच वर्षात शाळा बंद असल्यामुळे दुरूस्तीकडे कोणी लक्ष दिले नाही. बंद पडलेल्या शाळांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. या बंद पडलेल्या शाळांची गरज मतदानादिवशी लागलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ४३ शाळा या पटसंख्येअभावी बंद पडलेल्या आहेत. या बंद पडलेल्या शाळा दि. ७ मेला मतदानादिवशी उघडणार आहेत. मात्र मतदानाच्या वेळी निवडणूक अधिकार्‍यांसह मतदारांची गैरसोय होवू नये, याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button