इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या८५ टक्के उत्तरपत्रिका तपासल्या, दोन्ही निकाल ५ जूनपूर्वी


इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत दोन्ही वर्गाच्या सर्वच विषयांच्या जवळपास ८५ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण यापूर्वीच शाळांनी ऑनलाइन पद्धतीने बोर्डाला पाठविले आहेत. दरवर्षी पहिल्यांदा बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो. पण, यंदा दोन्ही वर्गांचे निकाल ५ जूनपूर्वीच जाहीर होतील, अशी सद्य:स्थिती असल्याचे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button