
लांजा तालुक्यातील इसवली रेवटेवाडी येथे एका ३५ वर्षीय तरुणाची आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या
लांजा तालुक्यातील इसवली रेवटेवाडी येथे एका ३५ वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवार मध्यरात्री १ वाजता घडली. याबाबतची खबर वडील नितीन दत्ताराम साळवी (५९ वर्षे, रा. इसवली रेवटेवाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन साळवी यांचा मुलगा गिरीराज नितीन साळवी (३५ वर्षे) हा व्यसनाच्या आहारी गेला होता. मंगळवारी ९ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता तो नेहमीप्रमाणे घरी आला होता. यावेळी त्याने नशेत घरातील माणसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो न जेवताच तो रात्री १२.३० सुमारास कपड्यांना इस्त्री करण्यासाठी किचन रूममध्ये गेला. तिथून तो कोणालाही काही न सांगता घरातून पाठीमागच्या दरवाज्याने बाहेर गेला आणि घराच्या पाठीमागील दरवाज्याला कडी लावून पाठीमागे आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.दरम्यान, घरातील लोकांनी त्याचा शोध घेतला असता घराच्या पाठीमागे असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत तो कुटुंबियांना आढळून आला. मात्र त्यावेळी त्याची हालचाल सुरू होती असल्याने त्याला तातडीने घरातील लोकांनी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासाअंती मृत घोषित केले.www.konkantoday.com