
मोदीसरकार पुन्हा आले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलले जाईल-अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर
मोदीसरकार पुन्हा आले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलले जाईल आणि यापुढे देशात कधीही निवडणुका होणार नाहीत, अशी भीती आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी व्यक्त केली आहे.अर्थतज्ञ परकला प्रभाकर हे नेहमीच परखड भाष्य करतात. याआधीही त्यांनी अनेकदा मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केलेली आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीत परकला प्रभाकर यांनी ही लोकसभा निवडणूक का महत्त्वाची आहे हे सांगताना भाजप आणि मोदी सरकारच्या षड्यंत्रापासून सावधानतेचाच इशारा दिला.www.konkantoday.com