जिल्ह्यातील ८०४ ग्राहकांना वीज दरवाढीचा फटका बसला

_रत्नागिरी जिल्ह्यातील सूक्ष्म व लघुउद्योजक अनेक समस्यांच्या गर्तेत आहेत. त्यात आता वीजदरवाढीची भर पडली आहे.जिल्ह्यातील ८०४ ग्राहकांना वीज दरवाढीचा फटका बसला आहे. विजेचे दर वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ होणार असून थेट नफ्यावर परिणाम होणार आहे. दरवाढीची झळ उद्योग क्षेत्रासह ग्राहकांनाही सोसावी लागणार आहे.मागील काही वर्षापासून रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे, (खेड), मिरजोळे (रत्नागिरी) दापोली, खेर्डी, खडपोली (चिपळूण) येथील एमआयडीसीमध्ये नव्याने लहान, मोठो कारखाने येण्यास सुरवात झाली आहे. मोठे उद्योग आले तर त्यावर आधारित लहान उद्योग सुरू होतात. या क्षेत्राला आवश्यक असलेली विविध उत्पादने तयार करणाऱ्या अनेक सूक्ष्म व लघू आकाराच्या कंपन्या येत आहेत. सद्यस्थितीत लोटे, खेर्डी, खडपोली, दापोली येथे २०६ सुक्ष्म व मध्यम उद्योग सुरू आहेत. ते महावितरणची वीज वापरतात. मोठ्या कारखानदारांचे मालकीचे वीज प्रकल्प आहेत. मात्र सुक्ष्म व मध्यम उद्योगांना वीज दरवाढीचा फटका बसला आहे. उद्योगांत सीएनडी, वेल्डिंगसाठी वीज मोठ्या प्रमाणात लागते. अनेक कंपन्यांत दोन किंवा तीन शिफ्टमध्ये काम चालते. परंतु आता विजेचे दर वाढल्यामुळे उत्पादन खर्चही वाढणार आहे. त्या प्रमाणात मोठ्या कंपन्या लघुउद्योगांना उत्पादनांचे दर वाढवून देत नाहीत. त्यामुळे लघुउद्योगांची परिस्थिती बिकट होणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button